पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वामी नारायण मंदिर, नाशिक एकदा पाहाल नक्की जाणार.....

इमेज
स्वामी नारायण मंदिर, नाशिक एकदा पाहाल नक्की जाणार..... | Swami Narayan Temple, Nashik स्वामी नारायण मंदिर, नाशिक अतिशय सुंदर असे आहे. मंदिरातील शिल्पांमध्ये भक्तांना होणार आहे भारतीय संस्कृतीचे दर्शन. नाशिक शहराला ऐतहासिक व पारंपारिक शहर म्हणून ओळखले जाते. तसेच या शहरामध्ये अनेक मंदिर आहेत. या मंदिराचे नाव बीएएस स्वामी नारायण मंदिर म्हणून ओळखले जाते.  स्वामी नारायण मंदिर, नाशिक :  Nashik : स्वामी नारायण मंदिर हे सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे. तसेच या मंदिरात सर्व देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. त्यामुळे ह्या मंदिरात सर्वच धर्मातील बांधव येत असतात. स्वामी नारायण मंदिर हे १४० फुट लांब, ५५ फुट रुंद, व ७८ फुट उंच असे मंदिर आहे. तसेच या मंदिरात ८० हजार घनफूट गुलाबी व १५ हजार घनफूट लाल दगडांचा वापर करण्यात आला आहे. मंदिरावरील नक्षीकाम हे अतिशय बारकाईने केले आहे. हे नक्षी काम हे सुबक आणि आकर्षक आहे. तसेच मंदिराचे स्तंभ, कमान हि कोरीव आहेत. नाशिक शहर हे कुंभमेळा तीर्थक्षेत्र असल्याने भाविकांना दर्शन होण्यासाठी स्तंभावर अनेक प्रकारच्या कलशांचे नक्षी काम करण्या

जीवनाचे सूत्र जीवनात पॉज हवाच....

इमेज
  The formula of life The formula of life : रोबोट सारखं सतत राबूनही मनासारखं घडत नाही. जीवनात यश मिळते की नाही, हाच विचार कायमचा धुडगूस घालतोय. सुवर्णाक्षणाच्या नेनिवेन वर्तमानाला हायस केलय. पण वर्षाच्या वर्ष उलटत असूनही आपण मात्र होतो तिथेच आहोत. नजरेसमोर केवळ काळोख दिसतोय. अंध:कारणं हृदय धडधडतय. अशावेळी मनातल्या विचारांच्या गोंधळाला बाजूला सारून पॉज घ्यायलाच हवा. कोण जाणे उत्तर काळाच्या उदरात दडलेले असतील. काही प्रश्नांवर वेळ हाच उपास अस. जीवनात असे प्रसंग येतात जे सोडवण्याची क्षमता आपल्यात नसते. ज्या गोष्टी मनुष्याच्या नियंत्रणाबाहेर असतात त्यावर कथ्थ्या कूट करण्यात वेळ घालवण्यात काही अर्थ नसतो. याचा अर्थ, तुम्ही स्वस्थ बसावं असा होत नाही. जेव्हा आपल्याला वाटतं की, सर्व मार्ग बंद झालेत, खरं तर, तेव्हाच तुमच्या उज्वल भविष्यासाठी अनेक मार्ग खुलायला लागलेले असतात. प्रत्यक्षात ते आपल्या सामान्य नजरेने दिसत नाहीत. अस्वस्थ आणि गोंधळलेल मन तर तिकडे लक्ष देऊ शकत नाही. अशावेळी शांततेचा पॉज गरजेचा असतो. सर्वप्रथम अंतर्मनाला शांत करणे गरजेचे असतं आणि ते पॉज घेतल्याशिवाय शक्य नसतं. बाहेरचं