जीवनाचे सूत्र जीवनात पॉज हवाच....

इमेज
  The formula of life The formula of life : रोबोट सारखं सतत राबूनही मनासारखं घडत नाही. जीवनात यश मिळते की नाही, हाच विचार कायमचा धुडगूस घालतोय. सुवर्णाक्षणाच्या नेनिवेन वर्तमानाला हायस केलय. पण वर्षाच्या वर्ष उलटत असूनही आपण मात्र होतो तिथेच आहोत. नजरेसमोर केवळ काळोख दिसतोय. अंध:कारणं हृदय धडधडतय. अशावेळी मनातल्या विचारांच्या गोंधळाला बाजूला सारून पॉज घ्यायलाच हवा. कोण जाणे उत्तर काळाच्या उदरात दडलेले असतील. काही प्रश्नांवर वेळ हाच उपास अस. जीवनात असे प्रसंग येतात जे सोडवण्याची क्षमता आपल्यात नसते. ज्या गोष्टी मनुष्याच्या नियंत्रणाबाहेर असतात त्यावर कथ्थ्या कूट करण्यात वेळ घालवण्यात काही अर्थ नसतो. याचा अर्थ, तुम्ही स्वस्थ बसावं असा होत नाही. जेव्हा आपल्याला वाटतं की, सर्व मार्ग बंद झालेत, खरं तर, तेव्हाच तुमच्या उज्वल भविष्यासाठी अनेक मार्ग खुलायला लागलेले असतात. प्रत्यक्षात ते आपल्या सामान्य नजरेने दिसत नाहीत. अस्वस्थ आणि गोंधळलेल मन तर तिकडे लक्ष देऊ शकत नाही. अशावेळी शांततेचा पॉज गरजेचा असतो. सर्वप्रथम अंतर्मनाला शांत करणे गरजेचे असतं आणि ते पॉज घेतल्याशिवाय शक्य नसतं. बाहेरचं

4G पेक्षा १०० पट अधिक वेगवान 5G नेटवर्क सुरू

4G पेक्षा १०० पट अधिक

वेगवान 5G नेटवर्क सुरू....

दिल्ली, मुंबई सह आजुन सहा ठिकाणी  5G नेटवर्क  5 g network ची सुरुवात 

Powering the future of connectivity in India
नवी दिल्ली New Delhi : देशात शनिवारपासून ५ जी मोबाईल इंटरनेट नेटवर्क सेवा सुरू झाली आहे. एअरटेल ने वाराणसी मध्ये आणि जिओने अहमदाबाद मधील एका गावात ५ जी ची सुरुवात केली असून यावेळी उत्तर प्रदेश आणि गुजरातचे मुख्यमंत्री उपस्थितीत होते. 
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले की, ५ जी ही डिजिटल कामधेनू आहे. भारतीयांच्या जीवनात ती आरोग्य, संपत्ती आणि आनंद आणेल. स्वस्त दरात आरोग्य सेवा शक्य होतील. जिओच्या माध्यमातून डिसेंबर पर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात म्हणजेच गावो गल्लीत देखील ५ जी सेवा पोहोचवली जाईल. मुंबई दिल्ली आणि देशातील अजून पाच शहरांमध्ये ही सेवा सुरू केल्याची घोषणा केली आहे. 



गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षा असलेल्या वेगवान म्हणजेच इंटरनेट सेवा ५ जी (5G India spotlight)
 ची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी झाली. ४ जी पेक्षा ५ जी सेवा ही १०० पट अधिक वेगवान असेल. "इंटरनेट फॉर" ऑल म्हणजेच इंटरनेट सर्वांसाठी या लक्ष प्राप्तीसाठी केंद्र सरकार सातत्याने कार्यरत असल्याचे यावेळी पंतप्रधानांनी सांगितले होते. 

केंद्र सरकारने अनेक सुविधा घरोघरी राबवल्या जसे की, प्रत्येक घरी वीज, हर घर जल अभियानातून प्रत्येक घरापर्यंत पाण्याचे प्रॉब्लेम सॉल केले. उज्वल योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीब कुटुंबेपर्यंत गॅस सिलेंडर पोचवले आहेत. त्याचप्रमाणे आता सर्वांना इंटरनेट म्हणजेच ५ जी ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, असे मोदी यांनी बोलून दाखवले आहे.  



21व्या शतकासाठी आजचा दिवस महत्त्वाचा असून, ५ जी  ची तंत्रज्ञान दूरसंचार क्षेत्रात क्रांती घेऊन येईल. 'डिजिटल इंडिया' चे मोठे यश असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

5 जी इंटरनेट सेवेमुळे आता संपूर्ण आर्किटेक्चर बदलणार आहे. ही बाब इंटरनेट वापरणाऱ्यांना माहिती आहे. 5g तंत्रज्ञानाने देशातील तरुणांसाठी अनेक संधी उपलब्ध होतील. तसेच देशातील टेलीकॉम इंडस्ट्रीने 130 कोटी भारतीयांना 5g च्या निमित्ताने एक भेट दिली आहे. ५ जी च्या संधीच्या अनंत आकाशाची सुरुवात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हणले आहे.  

२ जी, ३ जी, ४ जी च्या काळात भारत तंत्रज्ञानासाठी इतर देशांवर अवलंबून होता. परंतु, आता 5g नेटवर्क सोबत भारताने नवीन इतिहास रचला आहे, अशी भावना पंतप्रधान यांनी व्यक्त केली. 2014 मधील 'झिरो' मोबाईल फोन निर्यातीपासून ते आज आम्ही हजारो कोटी फोन निर्यात करणारा देश बनलेला आहोत. या सर्व प्रयत्नांना परिणाम डिवाइस च्या किमतीवर झाला आहे. आता कमी किमतीत आम्हाला जास्त फीचर्स मिळू लागले आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

सध्या डिजिटल पेमेंटचा मार्ग सर्व लोकं वापरतात. डिजिटल पेमेंटचा मार्ग सरकारने सुखकर  बनवला आहे. सध्या सगळी कामे ऑनलाईन झाली आहेत म्हणजेच डिजिटल सेवा उपलब्ध आहेत. आता ५ जी नेटवर्कमुळे डिजिटल सेवा कोणत्याही  अडचानावितिरिक्त पार पडतील.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नसर्गिक a natural treatment आयुर्वेदिक वनस्पतींचे उपचार (आजीबाईंच्या बटवा).......

मोफत प्रशिक्षनासही ८ हजार रुपये आपल्याला मिळतील, येथून करा ऑनलाइन नोंदणी...

रक्त शुद्धीकरण तसेच रक्ताच्या नसा साफ करून शरीर ठेवतात, तंदुरुस्त , हि ५ फळे खा रोज नियमित