4G पेक्षा १०० पट अधिक
वेगवान 5G नेटवर्क सुरू....
दिल्ली, मुंबई सह आजुन सहा ठिकाणी 5G नेटवर्क 5 g network ची सुरुवात
Powering the future of connectivity in India
नवी दिल्ली New Delhi : देशात शनिवारपासून ५ जी मोबाईल इंटरनेट नेटवर्क सेवा सुरू झाली आहे. एअरटेल ने वाराणसी मध्ये आणि जिओने अहमदाबाद मधील एका गावात ५ जी ची सुरुवात केली असून यावेळी उत्तर प्रदेश आणि गुजरातचे मुख्यमंत्री उपस्थितीत होते.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले की, ५ जी ही डिजिटल कामधेनू आहे. भारतीयांच्या जीवनात ती आरोग्य, संपत्ती आणि आनंद आणेल. स्वस्त दरात आरोग्य सेवा शक्य होतील. जिओच्या माध्यमातून डिसेंबर पर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात म्हणजेच गावो गल्लीत देखील ५ जी सेवा पोहोचवली जाईल. मुंबई दिल्ली आणि देशातील अजून पाच शहरांमध्ये ही सेवा सुरू केल्याची घोषणा केली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षा असलेल्या वेगवान म्हणजेच इंटरनेट सेवा ५ जी (5G India spotlight)
ची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी झाली. ४ जी पेक्षा ५ जी सेवा ही १०० पट अधिक वेगवान असेल. "इंटरनेट फॉर" ऑल म्हणजेच इंटरनेट सर्वांसाठी या लक्ष प्राप्तीसाठी केंद्र सरकार सातत्याने कार्यरत असल्याचे यावेळी पंतप्रधानांनी सांगितले होते.
केंद्र सरकारने अनेक सुविधा घरोघरी राबवल्या जसे की, प्रत्येक घरी वीज, हर घर जल अभियानातून प्रत्येक घरापर्यंत पाण्याचे प्रॉब्लेम सॉल केले. उज्वल योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीब कुटुंबेपर्यंत गॅस सिलेंडर पोचवले आहेत. त्याचप्रमाणे आता सर्वांना इंटरनेट म्हणजेच ५ जी ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, असे मोदी यांनी बोलून दाखवले आहे.
21व्या शतकासाठी आजचा दिवस महत्त्वाचा असून, ५ जी ची तंत्रज्ञान दूरसंचार क्षेत्रात क्रांती घेऊन येईल. 'डिजिटल इंडिया' चे मोठे यश असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.
5 जी इंटरनेट सेवेमुळे आता संपूर्ण आर्किटेक्चर बदलणार आहे. ही बाब इंटरनेट वापरणाऱ्यांना माहिती आहे. 5g तंत्रज्ञानाने देशातील तरुणांसाठी अनेक संधी उपलब्ध होतील. तसेच देशातील टेलीकॉम इंडस्ट्रीने 130 कोटी भारतीयांना 5g च्या निमित्ताने एक भेट दिली आहे. ५ जी च्या संधीच्या अनंत आकाशाची सुरुवात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हणले आहे.
२ जी, ३ जी, ४ जी च्या काळात भारत तंत्रज्ञानासाठी इतर देशांवर अवलंबून होता. परंतु, आता 5g नेटवर्क सोबत भारताने नवीन इतिहास रचला आहे, अशी भावना पंतप्रधान यांनी व्यक्त केली. 2014 मधील 'झिरो' मोबाईल फोन निर्यातीपासून ते आज आम्ही हजारो कोटी फोन निर्यात करणारा देश बनलेला आहोत. या सर्व प्रयत्नांना परिणाम डिवाइस च्या किमतीवर झाला आहे. आता कमी किमतीत आम्हाला जास्त फीचर्स मिळू लागले आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
सध्या डिजिटल पेमेंटचा मार्ग सर्व लोकं वापरतात. डिजिटल पेमेंटचा मार्ग सरकारने सुखकर बनवला आहे. सध्या सगळी कामे ऑनलाईन झाली आहेत म्हणजेच डिजिटल सेवा उपलब्ध आहेत. आता ५ जी नेटवर्कमुळे डिजिटल सेवा कोणत्याही अडचानावितिरिक्त पार पडतील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा